मदर्स डे किंवा मातृदिनाची कल्पना पाश्चिमात्य असली तरी ती मला एक चांगली प्रथा वाटते. किंबहुना असे काही दिवस साजरे करणं ही एक छान पद्धत आहे असं मला वाटतं. मे महिन्यातल्या दुस-या रविवारी मदर्स डे साजरा केला […]

मदर्स डे किंवा मातृदिनाची कल्पना पाश्चिमात्य असली तरी ती मला एक चांगली प्रथा वाटते. किंबहुना असे काही दिवस साजरे करणं ही एक छान पद्धत आहे असं मला वाटतं. मे महिन्यातल्या दुस-या रविवारी मदर्स डे साजरा केला […]
आम्ही १९८२ मध्ये औरंगाबादला कायमचे राहायला आलो. बाबांची बरीच मित्रमंडळी औरंगाबादेत होती. शिवाय त्यांचं शिक्षण म्हणजे एम ए आणि लॉ औरंगाबादला झालं होतं. त्यामुळे बाबांना औरंगाबाद नवं नव्हतं, पण आमच्यासाठी ते सगळं नवं होतं. औरंगाबादला आम्ही नवीन उस्मानपु-यात राहायला लागलो. पहिल्याच दिवशी बाबा मला श्रेयनगरमधल्या त्यांच्या मित्राच्या घरी घेऊन गेले, सुधीर रसाळांच्या घरी.
मी बापूकाकांना आधी भेटले होते तेव्हा फार लहान होते त्यामुळे माझ्यासाठी ते नवीनच होते. काका तेव्हा विद्यापीठात जायच्या तयारीत होते. मला पक्कं आठवतंय काका कांदा टोमँटोची कोशिंबीर करत होते, सोनल शाळेत निघाली होती तिच्यासाठी. एका बाजूला त्यांच्या आणि बाबांच्या गप्पा सुरू होत्या आणि खळखळून हसणंही.
माझी आजी जाऊन आज सहा वर्षं झाली. आजीचं खूप वय झालं होतं. गेली तेव्हा ती ९४ वर्षांची होती पण तरीही वयाच्या मानानं तल्लख होती. त्या वयातही तिचे बरेचसे दात शाबूत होते. लहानपणापासून आजी-आजोबांचा सहवास मला […]
गुलजार हा तसा कॉलेजपासूनचा जिव्हाळ्याचा विषय. गुलजारांच्या कविता, गुलजारांचे चित्रपट आणि गुलजारांनी इतर चित्रपटांसाठी लिहिलेले संवाद आणि गाणी, सगळंच प्रिय होतं आणि अजूनही आहे. निरंजनला पहिल्यांदा भेटले तेव्हा पटकन् आपलेपणा वाटण्यात गुलजार हा महत्वाचा भाग […]
माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्रामात ते दीड वर्ष तुरूंगात होते. हैदराबादला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी मागे पडलेल्या वकिलीला परत एकदा सुरूवात केली. बरोबरीनं त्यांचं सामाजिक काम चालूच होतं. गांधीवादी असलेल्या माझ्या आजोबांची राहणी अतिशय […]
आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांचा भग्नमूर्ती हा काव्यसंग्रह वाचून माझ्या सास-यांनी त्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर १९३६ मध्ये ते मुंबईला आले असताना मुंबईतल्या एम्पायर हॉटेलमध्ये ते उतरले होते. तेव्हा माझ्या त्यावेळी २३ वर्षांच्या असणा-या सास-यांना त्यांनी भेटायला बोलावलं होतं. १९३६ मध्ये जुळलेला हा बंध कवी अनिलांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९८२ पर्यंत कायम होता. माझे सासरे तसे व्यक्तिपूजेच्या अगदी विरोधात होते पण कवी अनिल आणि कुसुमावतीबाई हे दोघे त्यांच्यासाठी आदरस्थानं होती. भाई (माझे सासरे) आणि विजया आपटे यांनी जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा भाईंनी सगळ्यात आधी आपल्या वहिनीला ही गोष्ट सांगितली आणि त्यानंतर अनिल आणि कुसुमावतीबाईंना. मावशीनं सांगितलं की जेव्हा लग्नानंतर कुसुमावतीबाईंचं पहिलं पत्र आलं तेव्हा त्यांनी लिहिलं होतं की, तुमचं अभिनंदन करू की तुम्हाला आशीर्वाद देऊ?