मी दहावी-अकरावीत असेन. आम्हाला एका लग्नासाठी जायचं होतं. मी उत्साहानं आईला म्हटलं की, सगळ्यांचं पॅकिंग मी करते. आईही लगेचच हो म्हणाली. तसं मी सगळ्यांचं पॅकिंग केलं. आम्ही पोचलो. लग्नासाठी मी आईची साडी आणि ब्लाऊज घेतलं […]

मी दहावी-अकरावीत असेन. आम्हाला एका लग्नासाठी जायचं होतं. मी उत्साहानं आईला म्हटलं की, सगळ्यांचं पॅकिंग मी करते. आईही लगेचच हो म्हणाली. तसं मी सगळ्यांचं पॅकिंग केलं. आम्ही पोचलो. लग्नासाठी मी आईची साडी आणि ब्लाऊज घेतलं […]
सांगली-मिरजची भटकंती करायची ठरवली तेव्हाच इस्लामपूरला जायचं मनात होतंच. याचं कारण फेसबुकवरून ओळख झालेले चित्रकार अन्वर हुसेन हे इस्लामपुरात राहतात. हायवेवरून पेठ नाक्याला सांगली रस्त्याला वळलं की आधी इस्लामपूरच लागतं. तेव्हा परतीच्या प्रवासात इस्लामपूर करायचं हे नक्की ठरलेलं होतंच. इस्लामपूरबरोबर चितळ्यांमुळे प्रसिद्ध पावलेलं भिलवडी आणि त्याजवळच असलेलं औदुंबरही करावं असं ठरवलं होतं.
सांगलीहून परत निघाल्यावर इस्लामपूरच्या आधी भिलवडी लागतं. त्यासाठी मुख्य रस्त्यावरून थोडं आत वळावं लागतं. पण भिलवडीच्या रस्त्यावर वळलो आणि जागोजागी समृद्धीच्या खुणा दिसायला लागल्या. रस्त्याच्या दुतर्फा उसाची हिरवीगारं शेतं, मधूनमधून केशरी झेंडूच्या फुलांनी बहरून गेलेली शेतं, जागोजागी दिसणारी तळी यामुळे हा परिसर डोळ्यांना सुखावणारा होता. भिलवडीला चितळ्यांचा दुग्धव्यवसायाचा मोठा प्रकल्प आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे.
सह्याद्री भटकंतीसाठी सांगलीला जायचं ठरलं तेव्हा अर्थातच मिरज त्यात होतंच. कारण एक तर सांगली आणि मिरज ही जोड शहरं किंवा जुळी शहरं आहेत आणि दुसरं म्हणजे मिरजेला प्रचंड मोठा सांस्कृतिक वारसा आहे. इथे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच तारवाद्यं किंवा तंतुवाद्यं बनवण्याचे कारखाने आहेत. शिवाय किराणा घराण्याचे अध्वर्यू अब्दुल करीम खान यांची ही कर्मभूमी. म्हणूनच मिरजला जायचं या कल्पनेनं अक्षरशः हुरळून गेले होते.
सह्याद्री भटकंतीतला दुसरा टप्पा ठरवला होता सांगली-मिरज-इस्लामपूर. सांगली आणि मिरज हा सगळ्याच दृष्टीनं संपन्न भाग. चांगलं हवामान, चांगलं पाऊसमान या नैसर्गिक देणगीमुळे सांगली जिल्हा सतत हिरवागार दिसतो. एक्स्प्रेस हायवेवरच्या पेठ फाट्यावरून डावीकडे वळलं की सांगलीचा रस्ता लागतो. सध्या पावसामुळे रस्ता खराब झालेला आहे. पण आजुबाजूला सगळं इतकं हिरवंगार आहे की त्याकडे फारसं लक्ष जात नाही. कृष्णा आणि वारणा या दोन नद्या सध्या दुथडी भरून वाहताहेत. त्यामुळे जागोजागी भरलेली पाण्याची तळी, हिरवीगार उसाची शेती, दुतर्फा मोठमोठ्या पारंब्यांनी चव-या ढाळणारी वडाची मोठी झाडं, अधूनमधून दिसणारी बहरलेली, केशरी रंगानं न्हाऊन निघालेली झेंडूची शेतं या सगळ्यामुळे सांगलीकडे जातानाचा प्रवास रम्य होऊन जातो.
सांगली हे पटवर्धनांचं गाव. पटवर्धन हे इथले संस्थानिक. सांगलीत प्रवेश करताना आधी लागते ती सांगलीवाडी. थोडक्यात गावाबाहेरची सांगली. या सांगलीवाडीत आपण प्रवेश करतो तो ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या आयर्विन पुलावरून. हा पूल १९२७ तो १९२९ या दोन वर्षांच्या कालावधीत बांधला गेला. आणि त्यावेळी हा पूल बांधायला ६ लाख ५० हजार रूपये खर्च आला होता. तत्कालीन व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर जनरल आयर्विनच्या हातानं पूलाचं उद्घाटन झालं. या पुलाचे आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर तसंच सल्लागार हे तिघेही चित्पावन ब्राह्मण आहेत! आयर्विन पुलावरून आता जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी आहे.
मी यापूर्वीही अनेकदा कोल्हापूरला गेले आहे. कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातलं अतिशय सुबत्ता असलेलं शहर. मोठ्या शहराबरोबरच लहान गावाचं स्वरूप असलेलं. गावात शिरलात कीच तुम्हाला कोल्हापूरच्या अदबशीर संस्कृतीची जाणीव होते. गावात शिरल्या शिरल्या सरळ रस्त्यानं गेलात की पहिल्यांदा ताराराणीचा पुतळा लागतो, पाठोपाठ त्याच रस्त्यावर शाहू महाराज, शिवाजी महाराज असे पुतळे लागतात. कोल्हापूरमध्ये ताराराणी, शाहू महाराज, राजाराम, संभाजी, शिवाजी ही नावं सगळीकडे दिसतात. आपण एका ऐतिहासिक शहरात आलो आहोत याची पदोपदी जाणीव होत राहाते. या शहराला स्वतःचं एक एक खास कॅरेक्टर आहे. गावात जागोजागी जुन्या पद्धतीच्या दगडी, चिरेबंदी वास्तू आहेत. छोट्या छोट्या बंगल्या आहेत. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडं आहेत.